Tuesday, May 6, 2025

बरं तू माझी झाली नाहीस

"तरीही... मी तुझाच झालो"

बरं...
तू माझी झाली नाहीस.
पण मी मात्र तुझ्यात हरवून गेलो...

तुझ्या आठवणींच्या सावलीत
नकळत का होईना –
जगू लागलो.

तू हसलीस...
...आणि मी फुललो.
तू गप्प राहिलीस...
...तरी मी मनात तुझ्याशीच बोलत राहिलो.

तुझं नाव घेत घेत,
मी मनात तुझंच एक गीत वाजवत राहिलो.

हो…
तुला मिळवणं शक्य नव्हतं,
हे शेवटी उमगलं.

पण मनाच्या एका कोपऱ्यात —
...तुझ्यासाठी एक जागा राखून ठेवलीय मी.

प्रेमाची व्याख्या तुला कदाचित समजली नसेल,
...किंवा कदाचित मीच उशिरा आलो.

पण हे मात्र खरं —

तू माझी झाली नाहीस,
...तरीही मी शेवटी तुझाच झालो.

Wednesday, October 16, 2024

हरवलेले एक पान.

सागर आणि ऋतिकाची हि प्रेमकहाणी . . . हरवलेले एक पान . . सागर एक खाजगी आस्थापनेतील कंपनीत जेमतेम पगारावर नोकरीस असलेला . . आणि ऋतिका हि एक शिक्षक दांपत्याची मुलगी . संगीत गायन आणि चित्रकला यात विशेष रस असलेली . . .. दूरदेशी असलेल्या ऋतिका आणि सागर यांची नियतीने अशी . . काही भेट घातली कि . दोघे काही कालावधी साठी एकरूप झाले . . म्हणायला तसे दोघांची प्रत्यक्षात कधीच भेट झाली नव्हती पण . .दोघांची ओळखीचे माध्यम फेसबुक . . .आणि त्यावरील गप्पा गोष्टीतून . . एकमेकांचे विचार जुळले . . . एकमेकांचे मोबाईल नंबर एकमेकास शेहर केले गेले . . आणि फोनवरील गप्पा गोष्टीतून . . विचारातून हे दोघे एकमेकात इतके गुरफटले कि . . नंतर नंतर तर दो दिल एक जान . . .! एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी हि कहाणीची सुरवात . . . . .ऋतिकाचा आवाजच इतका मधुर . . ती अधून मधून . . सागरला गाणी ऐकवी . . कधी हार्मोनियम वर एखादे सुमधुर संगीत वाजवून दाखवी . . . तिचा आवाज , तिचे बोलणे . . हे सगळे सागर कित्येक दिवस पहात आणि ऐकत होता . . .! त्यातून सागर तिच्या प्रेमात हळू हळू गुरफटू लागला . . पण तेंव्हा सुरवातीला ऋतिका हि सागरला एक चांगला मित्र मानत होती .आणि काही दिवसांनी न राहून शेवटी एक दिवस सागरने तिच्यापुढे फोनवर आपल्या प्रेमाची कबुली दिली . . असे अचानक सागरचे बोलणे हा एक तर तिच्यासाठी अतिशय अविश्वसनीय असे होते . . तिला हे ऐकून धक्काच बसला . . . पण त्याचा . . चांगुलपणावर . . विस्वास ठेवून तिने त्याला . . असेच हो म्हंटले . . पण मनापासून नाही . . . तेंव्हा त्यावेळी सागरच्या ह्या विचित्र प्रपोझल ने ऋतिका थोडी शॉकिंगच झाली होती . . पण पुढे पुढे दोघांचे फोनाफोनी इतकी वाढली कि . . सुरवातील वर वर होय म्हणारी ऋतिका नंतर नंतर सागरच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली कि . . . . एक दिवस आणि एक क्षण पण असा जात नसे कि एकमेकांचे फोनवर बोलणे होत नाही असे कधीच होत नसे . .. हे इतके मनस्वी प्रेम करणारे हे सागर ऋतिका . . हे जणू काही एक दुजेकेलिये . . बनले गेले आहेत कि काय असे . . वाटत . . आणि चित्रपटातील हिरो हिरोईन एक होऊन चित्रपट संपतो . . पण इथे काही वेगळेच झाले . . . आपल्या आईवडिलांच्या आज्ञेविरोधात नाजाणारी ऋतिका एक दिवस तिच्या आई वडिलांनी पसंद केलेल्या मुला सोबत लग्न करून दूरदेशी निघून गेली . इकडे सागर पण काही दिवस . . तिच्या विरहात अस्वस्थ आणि शांत शांत राहिला पण त्याने ऋतिकाला कधीच दोष दिला नाही . . त्यानें तर तिला अभिमानाने सांगितले . . . जेंव्हा शेवटचा ऋतिकाचा कॉल आला तेंव्हा हृतिक सागरला म्हणाली . . माझे लग्न ठरले आहे रे . . . . हे सांगताना तिचे अंतःकरण खूपच जड झाले होते . . पण मी आई वडिलांच्या जो समाजात मान आहे तो नाही दुखावू शकत . . . मला माफ कर . . . हे ती भरल्या डोळ्यांनी आणि जड मनाने हृतिक सागराला फोनवर सांगत होती . तेंव्हा सागर उतरला . . असूदेत ग आपल्या मनाचा आणि सोबतीचा प्रवास हा इथपर्यंतच . . . पण एक सांगतो जातेस तर निघून जा .सुखी रहा . . आणि देवाकडे माझ्यासाठी एकाच मागणे माग. . . "भविष्यात कधी माझे लग्न होईल तेंव्हा मला . . पहिले अपत्य मुलगीच होवूदेत . . आणि ते तुझ्यासारखेच असूदेत . ." जे कि आपल्या आई वडिलांचा समाजात मान राखेल . . जे आईवडिलांची मन कधी खाली जाऊ देणार नाही . . . . आई वडिलांना दुखावून कोणीच सुखी नाही राहू शकत . . ना तू. . . . ना मी . शेवटी हरवलेले सागरच्या मनातील एक पान . . हरवलेलेच राहील. इकडे सागर आपल्या संसारात सुखी आणि तिकडे ऋतिकाआपल्या संसारात सुखी . . हल्ली नाही म्हणायला एखादा मॅसेज असतो फोनवर आणि त्यातूनच एक मेकांची ख्याली खुशाली विचारली जाते. . . . समाप्त . . कथा काल्पनिक आहे . . .

शाळेतील माझा युनिफॉर्म

गोष्ट साधारपणे काही वर्षांपूर्वीची आहे . . मी आठवीत व माझा भाऊ नववीत असे शिकत होतो . . त्यावेळी आमच्या शाळेचा युनिफॉर्म हा पांढरा हाप शर्ट व खाकी हाप पॅन्ट असा होता. . शाळा सुरु होऊन काही दिवस झालेले . . आणि शाळेत युनिफॉर्म ची सक्ती . . जे कोणी युनिफॉर्म घालून येणार नाहीत त्यांना प्रार्थना झालेनंतर . . बाजूला बोलावून पी इ चे टीचर . . दहा छड्या द्यायचे . . . असा दिनक्रम असायचा . . आमची त्यावेळी परस्थिती बेताचीच असलेमुळे . . आणि माझे वडील एकटेच कमावते असलेने . . युनिफॉर्म तसा आम्हांला उशिराच मिळायचा . . अजाणते वय आमचे . . आम्ही दररोज आईकडे हट्ट करायचो. . . आज परत छड्या खाव्या लागणार बघ . . उद्या जर युनिफॉर्म नसेल तर मी काय शाळेला जाणार नाही . .असे दररोज किती छड्या खाणार म्हणून असा दम वरून आईला देत असे . . तेंव्हा ते माझ्या न-कळत वडिलांनी ऐकले . . आणि संध्यकाळी कामावरून येताना त्यांनी . . एक जुना पांढरा शर्ट मला बसेल असा . . बाजारातून . . आणला . . जुना तर जुना . . छड्या तरी वाचल्या हि माझी तेंव्हाची मानसिकता . . आणि जुना शर्ट पाहून . . आईने नाक मुरडले . . आणि नाराजीच्या स्वरात आई बाबांना म्हणाली . . अहो. .काय हे . . . जुना शर्ट. . . तेंव्हा वडिलांचे . . एक वाक्य . . आज देखील कानात तसेच घोळत आहे . . नवीनच घ्यायला गेलो होतो पण . . तितके पैसे नव्हते . . मग . . चालूला तर होईल ह्याला . . . आणि नियमित शाळेला तरी जाईल . . .... त्यावेळी त्या गोष्टीचे मला इतके काही वाटले नाही . . पण आज अचानक एक वडील आपल्या मुलाला जुने कपडे घेताना पहिले . . . आणि त्यात थोडी किंमत कमी करा अशी गया वया करू लागले . . हे चित्र जेंव्हा मी समोर पाहिलं तेंव्हा मला माझं बालपण आठवून अक्षरशा खूप गहिवरून आले . . आज माझे वडील हयात नाहीत. .तेंव्हा . . ह्या व्यक्तीला वडिलांचा जागी पाहून अक्षरशा. . मन भरून आले. . . अगदी अशीच अवस्था झाली असेल त्यावेळी माझ्या वडिलांची .

ती आणि माझं लेखन . . !

ती आणि माझं लेखन . . ! ती मला हल्ली विचारतेच विचारते . . तू पूर्वीसारखे का लिहीत नाहीस . . . उत्तर दिले मी तिला . . अंगातील आळस अजून बाकी काय . . पण खरं सांगू . . . तेंव्हा तू . . होतीस लिहिण्यासाठी वेळ होता . . . आणि कल्पना समोर मांडी घालून बसायच्या . . मला उत्तर मला उत्तर म्हणायच्या . . पण ती वेळ सरली . . तू आणि मी आपण दोघेही संसाराला लागलो . . . कदाचित समोर बसलेल्या कल्पना . . . आपल्या दोघांच्या वेगळ्या वाटा पाहून . . निघून गेल्या . त्या परातल्याच नाहीत . .. आणि हल्ली माझं कल्पनेचं तळ कसं कोरड कोरड पडलंय . .. ! आणि हो .. .. . . हल्ली तर घरातील रेशन ची लिस्ट तयार करणे बायको जसे सांगेल तसं इतपतच मर्यादित उरलंय लिखाण माझं.

Tuesday, October 15, 2024

गावातील तरुण मंडळे आणि त्यांची वाटचाल.

हि गोष्ट आहे साधारपणे . . २० ते पंचवीस वर्षपूर्वीची . . आमच्या गावातील मंडळांची. *गणेश चतुर्थी म्हंटले कि , चर्चा चालू होते ती आपसूक गावातील तरुण मंडळांची  त्यातील काही मंडळे काळाच्या ओघात बंद पडली.  तर काही नवीन उदयास अली.  तर काही मंडळे वर्षानुवर्षे टिकून , आपले स्वतंत्र अस्तित्व  आणि आपले वेगळेपण अबाधित ठेवून आहेत त्यातीलच काही हि खालील तरुण  मंडळे.  आणि त्यांचे वैशिष्टय थोडक्यात.  *श्री . महालक्ष्मी तरुण मंडळ* स्थळ : एस टी स्टॅन्ड महालक्ष्मी मंदिर आप्पाचीवाडी गावातील सर्वात जुने मंडळ , वेगवेगळ्या कला कृती.  आणि सजीव देखाव्यातून आपली कला सादर करणारे हे एक गावातील सुप्रसिद्ध मंडळ . यांचा चलेजाव चळवळीतील सजीव देखावा आणि वारकरी दिंडी हे देखावे चिरकाल स्मरणात राहणारे असे आहे . गावातील कलाकारांच्या कलेला चालना देणारे हे एक उत्कृष्ट मंडळ आहे असे मंडळ  अद्यापही आपले वेगळेपण आणि नावीन्य टिकवून आहे . *जय शिवराय तरुण मंडळ* स्थळ : श्री हालसिद्ध नाथ मंदिर (वाडा ) व भागीरथी देवी मंदिर आप्पाचीवाडी. गावातील एक पौराणिक देखावे सादर करणारे असे हे एक प्रसिद्ध मंडळ . पण काळाच्या ओघात हे मंडळ आपले अस्तित्व टिकवू शकले नाही . सध्या बोर्ड रूपाने ह्या मंडळाच्या स्मुर्ती  तेवढ्या अस्तित्वात आहेत .     *न्यू गणेश तरुण मंडळ.* स्थळ : लोहार गल्लि  आप्पाचीवाडी .  मर्यादित सभासद संख्या असलेले  पण नावीन्य पूर्ण  सजीव देखावे सादर करणारे गावातील एक नावाजलेले मंडळ.  कालानुरूप आपल्यात बदल करून सध्या दिमाखात उभे असलेले हे एक गावातील नामवंत  असे तरुण मंडळ .  *शाहू तरुण मंडळ*  स्थळ : माने गल्ली आणि पोटले गल्ली , आप्पाचीवाडी .    नावाप्रमाणे शाहू महाराज यांचा विचारांचा वारसा जपणारे गावातील एक जुने जाणते मंडळ म्हणजे शाहू तरुण मंडळ ,छत्रपतींचे मर्दानी खेळ साजरे केले ह्याच मंडळाने . . आणि लोककला लावणी देखील साजरी केली ह्याच मंडळाने . . आणि एकवर्षी तर ढकलगाडीवरून श्री गणेशाची मिरवणूक काडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील ह्या मंडळाने दिला . असे हे   मंडळ आजही हे मंडळ आपले अस्तित्व अगदी दिमाखात टिकवुन आहे *अष्टविनायक तरुण मंडळ.*  स्थळ : कुंभार , आबणे  आणि गारगोटे  गल्ली , आप्पाचीवाडी .  सामाजिक बांधिलकी जपणारे असे हे एक गावातील वैशिष्ठपूर्ण मंडळ. आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आज दिमाखात उभे आहे .   *सिद्धीविनायक  तरुण मंडळ.*  स्थळ : कुंभार गल्ली , आप्पाचीवाडी .   अष्टविनायक तरुण मंडळ   याची फाळणी होऊन निर्माण झालेले हे एक तरुण मंडळ . आपले वेगळेपण आणि अस्तित्व टिकवून आजदेखील तितक्याच तत्परतेने अस्तित्वात आहे .  *जयभीम तरुण मंडळ.*  स्थळ : भीमनगर , आप्पाचीवाडी . डॉ . बाबासाहेबांच्या विचाराचा पूर्वापार चालत आलेला वारसा जपत चालू असणारे हे एक गावातील प्रतिष्ठित मंडळ . आपले  अभेद्य विचार आणि आचार अबादित राखून आजही  दिमाखात अस्तित्वात  आणि उभे आहे .  *शिवप्रेमी तरुण मंडळ.* स्थळ : पेठ गल्ली  , आप्पाचीवाडी. ऐतिहासिक आणि पौराणिक देखावे सादर करणारे कधी काळाचे गावातील सुप्रसिद्ध मंडळ . . भीष्मपितामह, अंतराळ तरंगणारे  साधू, रांज्यांचा पाटील, छत्रपती संभाजी महाराज, भीमाचे गर्वहरण  असे अनेक चिरकाल स्मरणात रहाणारे  सजीव देखावे ह्या मंडळाने सादर केले पण असे हे प्रसिद्ध मंडळ  काळानुरूप नामशेष झाले आज फक्त बोर्ड रूपाने त्याचे अस्तित्व आहे . मंडळ तर कधीच बंद झाले आहे .  *बाल  गणेश  तरुण मंडळ.*  स्थळ : खडक चौक , आप्पाचीवाडी. कधी काळी लहान मुलांनी  चिकलि गणपती बनवून सुरवात केलेलं हे एक छोट मंडळ आज एक महान अश्या वटवृक्षात रुपातन्तरित झालेलं आहे . वेगवेगळे समाजीक उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जपत हे मंडळ आज देखील पूर्वीच्याच जोशात आपले  अस्तित्व टिकवून आहे .  *फ्रेंड सर्कल*  स्थळ : सर्कल , आप्पाचीवाडी. गावातील एक सर्वात तरुण  आणि अल्पावधीत प्रसिद्धी पावलेले असे हे  मंडळ . अनेक उपक्रमांनी नावारूपास आणि प्रसिद्धीस  येताना दिसत आहे .  *संभाजी  राजे  तरुण मंडळ*  स्थळ : संभाजी नगर , आप्पाचीवाडी. कधी काळी सुप्रसिद्ध  असणारे हे गावातील एक नामवंत  मंडळ . . मध्यंतरी काही कालावधी साठी लोप पावले होते . पण जुन्या कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने परत ते उभे करून परत नावारूपास आणले आहे . सध्या हे मंडळ जुन्या काळात जसे प्रसिद्ध होते तसेच आज देखील अगदी नावीन्य पूर्ण उपक्रमाने भरभरून असे  उभे आहे .  अश्या सर्व तरुण मंडळांना .. गणेश चतुर्थी पुरते मर्यादित न रहाता विविध सामाजिक उपक्रम राबवून  आपल्या *आप्पाचीवाडी* गावाचे नाव उज्वल करतील अशी .. *श्री चरणी प्रार्थना* आणि त्यांच्या  पुढील वाटचालीस भरभरून मनापासून खूप खूप  शुभेच्छा .  ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ गणेश चतुर्थी म्हंटले कि,* आमच्यासाठी पर्वणी असायची . . विशेष आकर्षण असायचे ते गणपतीत मंडळाकडून उभे केले गेलेले सजीव देखावे . ते पाहणे व त्याची मज्जा काही औरच होती . . दुसऱ्यादिवशी गावात आणि गल्लीत बायाबापड्यात चर्चा रंगायची कि, कालचा कुणाचा देखावा एक नंबर होता . . त्या काळी होते ते सगळे एक नंबरच . . दोन नंबर असे काही अस्तित्वातच नव्हता. गणपतीत सादर केले जाणारे देखावे यामध्ये सादरीकरणापूर्वी कमालीची गुप्तता पाळली जायची कोणत्या दिवशी कोणता देखावा सादर होणार हे त्या मंडळातील फक्त कार्यकर्त्यास सोडून गावातील कोणाला याची छोटीशी चुणूक देखील नसायची . . . *मंडळाच्या गणपतीची वर्गणी देखील देणे नजमणारी अशी हि आमची पिढी होती* . .त्यामुळे पुंगळ्या कडून बाईक रॅली असे काही करायचे असते याची पुसटशी कल्पना देखील नसलेली आमची पिढी . . डॉल्बीच्या धागडधिंगा पासून कोसो दूर असणारी आमची पिढी, मिरणुकीच्या नावाखाली . . धुडगूस न-घालणारी आमची पिढी . . गणपतीला देव मानून . . त्या गणरायाला घाबरून असणारी व त्या गणरायाची मनोभावे सेवा करणारी आमची पिढी . . तेंव्हा मंडळाचे गणेशमूर्ती तसे छोटेच असायचे . ठराविक मंडळ मात्र मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करायचे . . बाकीच्या मंडळांची मूर्ती जरी छोटी असली तरी कारकर्त्यांचा उत्साह आणि मन मात्र आभाळाएवढ मोठं असायच . . कार्यकर्ते तहानभूक हरपून मंडळाच्या कार्यात स्वतःला झोकून द्यायचे . . इतर मंडळा पेक्षा आपले मंडळ कसे सरस होईल अशी एक वेगळीच इर्षा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात रुजलेली असायची . . मात्र कुणाच्या मंडळाबद्दल कोणत्या कार्यकर्त्या बदल असूया मात्र मनात अजिबात नसायची . . त्यावेळी मंडळाच्या सजीव देखाव्यामध्ये सहभागी असण्याऱ्या प्रत्येक कलाकार मंडळींना काल रात्री केलेलं पात्र या नावाने दुसऱ्या दिवशी गावातील लोकांच्या कडून हाक मारली जायची त्यामुळे अश्या कलाकारांचा तेंव्हा रुबाब काही औरच असायचा . काही कार्यकर्ते तर महिनोमहिने . . त्या पात्रातून बाहेर यायचे नाही . ते उत्साहचे वातावरण काही औरच होते . . कधी कधी तो तिला पाहण्यासाठी म्हणून *कारण त्यावेळी आजच्या सारखे मोबाईल नव्हते त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे तेंव्हा कुणाच्या स्टेटसला कधीच धक्का लागला नाही.* *कोण कुणाचा स्टेट्स पहाण्याचा भानगडीत देखील पडले नाही.* म्हणून तर कार्यकर्ते मंडळाचे काम ते आपले घरचेच काम समजून .. त्यात . तनमन झोकून देऊन . . ते काम तडीस न्यावयाचे . . तसेच गणपतीला नवीन लग्न झालेली माहेरवाशीण . . माहेरी यायची . . आणि लग्नाआधी जी आपल्याकडे कधी पहायची देखील नाही . . ती कुठे भेटली तर ती आपुलकीने चौकशी करायची . . पण हल्ली काळ बदलला . . काळ पुढे सरकला . . . आता लोक भौतिक जगातून व्यावहारिक जगात प्रवेशले गेले तसे जी कार्यकत्यात असणारी आपुलकी आणि उत्साह थोडा का होईना पण कमी होत चालला लोप पावत चालला . . जो तो आपल्या व्यावहारिक विश्वात रमून गेला . . . . . सगळे ऍटोमॅटिक झाले . . सगळे रेडिमेड आले . . आणि पूर्वीचा आनंद हल्ली लोक विसरत चाललेत . ... *@लेखन गजानन रा माने.*

Wednesday, February 9, 2022

आयुष्याचा शेवट

आयुष्याच्या शेवटी . . आठवणींचे गाठोडे सोडून बसू तेंव्हा आल्हाददायक आठवणी सोबत असायला हव्यात . . त्यासाठी तरुणपणी परोपकाररुपी चॅप्टर हा जास्त भरलेला असायला पाहिजे . तरच शेवट शांत होत असतो.

Saturday, January 23, 2021

अशी काही हि कर्म  कहाणी   माझ्या जीवनाची . .  . ??

अशी काही हि कर्म  कहाणी   माझ्या जीवनाची . .  . ?? सीताचा संसार अगदी सुखाचा चाललेला होता . .   सीताला एक मुलगी दोन मुले आणि पती असा सुखाचा संसार होता .  सर्व काही दृष्ट लागण्यासारखे असेच होते  . सीता तशी अतिशय स्वभावाने गावात  खूपच चांगली होती . तिचा स्वभाव खूप प्रेमळ होती. तिचे माहेर  देखील गावातीलच  तसे असले तरी माहेरी ती क्वचित प्रसंगी जात असत . सासर माहेर दोन्ही अगदी सुखसोयींनी सदन असे होते .  सर्व काही चांगले चालले होते .  तिचा नवरा एका खाजगी हायस्कुल मध्ये क्लार्क म्हणुन कार्यरत होता . त्यांना तीन मुले त्यात त्यांची जया ही मुलगी मोठी असल्यामुळे तिचे लग्न थोडे लवकरच झाले होते, त्यांना जावई  देखील खूप चांगला मिळाला होता . आणि सीताचा एक मोठा मुलगा उत्तम शेती सांभाळत आणि सर्वात लहान  मुलगा  जो होता तो मिल्ट्रीत भरती साठी ट्राय  करत असे . असे तिचे गावातील एक सुखी कुटुंब अतिशय आनंदाने नांदत होते .  तसे पाहिले तर सीतासाठी कुटुंब हेच तिचे सर्वस्व आणि सर्वकाही होते.  पण म्हणतात ना "सुखी संसाराला कुणाची दृष्ट ना लागो . !"  नेमके सीताच्या बाबतीत हेच झाले . . पतीच्या पोटात अचानक दुखू लागले, त्यांना खूप  वेदना होऊ लागल्या   म्हुणुन त्यांना शहरच्या एका दवाखान्यात ऍडमिट केले . . त्याचे निदान असे आले कि अपेंडिक्स फुटून त्याचा स्त्राव पूर्ण पोटात पसरलेला आहे . . आणि दवाखान्यात आणण्यास खूपच उशीर झाला आहे . . तेंव्हा त्याच आजाराने सीताच्या पतीचा अखेर बळी घेतला दवाखान्यात साधारपणे पाच ते सहा दिवस उपचार चालले पण डॉक्टरांना शेवटी यश  काही  केल्या आले नाही .  सीताचा  पती इहलोकीची यात्रा संपवून सीताला सोडून कायमचे निघून गेले.  इकडे  तेही दुःख सीताने  काही दिवसात पचवले पण सीताच्या पुढे नियती काही वेगळाच डाव खेळणार होती . . आणि बिचार्या सीताला याची पुसटशी देखील कल्पना नव्हती.  नवरा गेल्याचे दुःख पचवत सीताने आपल्या मोठ्या मुलाचे कसेबसे तरी लग्न जमवले . मुलाचे लग्न झाले सीताच्या घरी नवीन लक्षमी सारखी सून अली , नवीन सुनेच्या सहवासात सीता आपला नवरा गेल्याचे दुःख विसरली आणि परत त्याच जुन्या जोमाने आणि हिमतीने संसाराला लागली . . पण पण नियतीला हे तिचे आनंदी रहाणे पसंद नाही आले .  तिचा लहान मुलगा शाम  जो सैन्यातभरती साठी प्रयत्न करीत होता तो सीताचा अतिशय लाडका शाम होता . . त्याला अति व्यायाम आणि अतिरनिंग याचा परिणाम  श्यामच्या मेंदूवर झाला त्याला ब्रेनस्ट्रोक चा झटका बसला आणि मेंदूतील नसा फुटून मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन शाम कोमात गेला .  तो आता  परत कधी न उठण्यासाठीच कायमचाच . . त्याला शहराच्या  एका मोठ्या नामवंत  दवाखान्यात ऍडमिट केले गेले, पण उपचाराला त्याने शेवटपर्यंत काही साथच नाही दिली आठ दिवस उपचार चालू होते . पण शेवटी सीताचा  लाडका शाम सीताला सोडून कायमचा निघून गेला.  सीता आता पुरती कोलाडमडली हातातोंडाशी आलेला घास असा अचानक कुणीतरी हिरावून न्यावा तसेच सीतेच्या बाबतीत घडले. लाडका शाम असा अचानक निघून जाणे आणि हे दुःख पचवणे सीतेसाठी खूपच वेदनादायी होते .  शाम आता काही दिवसातच मिळवता झाला असता असा मुलगा . सीतेचं लाडकं प्यार असं  अचानक बापानंतर आईला सोडून निघून गेलं होत . पण इकडे नियती सीतेचं  सतपण पावलो पावली घेतच  होती, नियती सीतेपुढे अनेक डाव सोडत होती  . . नियतीने सीतेचा कठोर परीक्षा घ्यायची असा जणू चंगच बांधला होता . .  झाले,  उणेपुरे शामला जाऊन आता सहा एक महिने झाले असतील सीतेच्या घरात एक आनंदाची बातमी अली . सीता आता आज्जी होणार होती . झालं सीतेचा आनंद आता गगनात मावेना . नवऱ्या पाठोपाठ लाडक्या मुलाचे असे आकस्मित जाणे सीतेने पचवले आणि आता नवीन आनंदाची स्वप्ने पाहण्यात ती रमून गेली .  पण इकडे सीतेला आनंदी पाहून नियती चांगलीच  खवळली हि इतकी दुःखे इतक्या लवकर कशी सहज पचवू शकते . . हे पाहून नियती देखील अचंबित झाली , तिने अजून कठोर होण्याचे ठरवले  . . आणि तिने सीतापुढे तिसरा डाव खेळाला . . सीतेचा थोरला मुलगा जो बाप होणार होतात त्याचे आणि त्याच्या बायकोचे काही तरी बिनसले आणि किरकोळ कारणातून सीतेचा मोठा मुलगा . . भैरवने कीटकनाशक प्राशन  करून तो देखील आपल्या वडील आणि भावाच्या दिशेने निघून गेला . .  हे इतक्या जलद झाले कि कुणाला श्वास घेण्याची देखील नियतीने उसंत नाही दिली . त्याचे झाले असे . .  भैरवने रात्रीचे जेवण केले आणि आईला म्हणजे सीताला तो म्हणाल कि आई मी शेतात जाऊन जरा ज्वारीला पाणी लावून येतो . . पण ह्याच्या मनात आज काही वेगळेच खेळ  चालले होते . . तो शेतात गेला आणि सोबत आणलेली कीटकनाशकची अख्खी बॉटल ह्याने पिऊन टाकली . . आस- पास कोणी नसल्यामुळे त्याने तेथेच शेतात तळमळून तळमळून जीव सोडला होता .  ही  बातमी जेंव्हा सीतेला कळली तेंव्हा ती पुरती  कोसळली . . इकडे सून माहेरी गेली होती जेंव्हा तिला हि भैरवच्या  आकस्मित गेल्याची  बातमी कळली तेंव्हा तीला जोरदार मानसिक धक्का बसला त्यातच तिला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिची म्हणजे सीतेची सून  सायलीचे प्राणज्योत मालवली .  गावात एकाच  सरणावर भैरव आणि सायलीला भडाग्नी देण्यात आला . . त्यांचा सोबत एक उमलणार नवा अंकुर सायलीच्या पोटी  होता त्याने देखील हे जग पाहण्यागोदरच ह्या जगाचा निरोप घेतला  होता . . सीता  तर आता भरल्या संसारातून पुरती उठली होती . . पतीचे दुःख पचवले त्यानंतर लगेच दोन वर्षांनी लाडका मुलगा शाम ह्याला नियतीने हिरावून नेलेले लगोलग वर्ष सहा महिन्यात . . थोरला मुलगा भैरव आणि आणि सून सायली ह्यांना देखील नियतीने अलगत उचलून नेले होते .  सीता आता गावात एकटीच असते . नाही म्हणायला कधी अधेमधे मुलगीकडे जाते , अजून जगण्याची लढाई सीता त्याच जोमाने लढते आहे . . आणि शेवटी नियतीला एका प्रश्न विचारते  कि , अशी काही हि कर्म  कहाणी   माझ्या जीवनाची . .  . ?? तेंव्हा सीतापुढे नियती नतमस्तक होते, नियतीला देखील पश्चताप होत  असावा आता . . कारण सीता अनेक दुःखे पचवून देखील त्याचा संयमाने आणि त्याच जोशाने जीवनाचा गाडा न कुर कुर करता  आज देखील ओढते आहे .  +समाप्त + टीप : कथा पूर्णतः  काल्पनिक आहे , 

Thursday, November 28, 2019

कर्ण 

कर्ण, कर्णाची बाजू सत्याची कि असत्याची माहित नाही.  पण एक मात्र खरे सारे जग विरोधात असताताना  तो आपल्या मित्राची बाजू घेऊन त्याचे पाठीशी ठाम उभा होता . हाच खरा त्याचा कर्तृत्वपणा  नाही का ? कारण आपल्या कठीण पडत्या क्षणी ज्यांनी ज्यांनी आपल्याला हात दिला,  साथ दिली त्यांच्या सोबत तुम्ही नेहमी रहा.  अगदी तुमचा त्यामध्ये शेवट होणार असेल तरी माघार नको हीच शिकवण  दानशूर कर्ण  आपल्याला त्यांचा आचरणातून शिकवून जातो . . म्हणूच तो असत्याचा बाजूने जरी उभा असला तरी . . तसा  मित्र दुर्योधन याना  लाभणे हे देखील त्यांचे भाग्यच नाही का ? कारण असा मित्र अर्जुनाला  श्रीकृष्ण सोडले तर कुठे लाभला होता . . ?? गजानन रा. माने दिनांक २८. ११. २०१९

Wednesday, November 26, 2014

वेडीवाकडी वळणे

एखाद्या घाटातून जाताताना . .वाहने सावकाश हाका असे फलक हमखास पाहायला भेटतात . . हे सावधानतेच सुचकच असते. पण,जीवनाची गाडी हाकताना अशीच वेडीवाकडी वळणे जीवनाच्या रस्त्यावर येतात . आपला पुढचा प्रवास नीट आणि सुखकर व्हावा असे वाटत असेल तर थोडे वाकडे व्हावेच लागते परस्थितीनुसार. तरच उचित ध्येयास आपण पोहचू शकतो, नाही का ?

Friday, November 21, 2014

शेवटची भेट

"काल  माझ्याकडे आली ती मला  शेवटचे भेटण्यासाठी
दाबून ठेवलेल्या हुंद्क्याना मोकळीवाट करून देण्यासाठी."
ती : परत तू प्रेमात पडशील.
मी : निर्जीव देह फक्त जाळण्याच्याच कामाचा
@ गजानन माने.

Saturday, September 28, 2013

परतून देशील का ती नजर प्रेमात परत पडायला .


ओशाळल्या नजरेला 
परत प्रेमाची आस नको 
तुटलेल्या त्या मनाला 
 परत प्रेमाचा भास नको 
वास तर येतो फुलांचा 
पायदळी तुडवता 
चुरगळलेल्या त्या फुलांना 
परत कसलीच आस  नको 
नाहीच आठवण काढली कुणी तरी
मनातून  दुखाचा ठाहो नको 
सगळ काही संपले तरी 
इतरांना संपवण्याची भाषा नको 
परत परत प्रेमात पडण्याची 
मनाला त्या आता नशा   नको 
@ गजानन माने .  २१. ०९. २०१३


तुझी एक झलक, माझ्यासाठी ...

प्रिये... डोळे तुझे मदमस्त, गाल तुझे लाल, ओठांवरी मलई जशी चांदण्यांची शाल. नजरेत तुझ्या दडलेले घायाळ करणारे वार, एका कटाक्षाने...