Search This Blog

Wednesday, February 9, 2022

आयुष्याचा शेवट

आयुष्याच्या शेवटी . . आठवणींचे गाठोडे सोडून बसू तेंव्हा आल्हाददायक आठवणी सोबत असायला हव्यात . . त्यासाठी तरुणपणी परोपकाररुपी चॅप्टर हा जास्त भरलेला असायला पाहिजे . तरच शेवट शांत होत असतो.

Saturday, January 23, 2021

अशी काही हि कर्म  कहाणी   माझ्या जीवनाची . .  . ??

अशी काही हि कर्म  कहाणी   माझ्या जीवनाची . .  . ?? सीताचा संसार अगदी सुखाचा चाललेला होता . .   सीताला एक मुलगी दोन मुले आणि पती असा सुखाचा संसार होता .  सर्व काही दृष्ट लागण्यासारखे असेच होते  . सीता तशी अतिशय स्वभावाने गावात  खूपच चांगली होती . तिचा स्वभाव खूप प्रेमळ होती. तिचे माहेर  देखील गावातीलच  तसे असले तरी माहेरी ती क्वचित प्रसंगी जात असत . सासर माहेर दोन्ही अगदी सुखसोयींनी सदन असे होते .  सर्व काही चांगले चालले होते .  तिचा नवरा एका खाजगी हायस्कुल मध्ये क्लार्क म्हणुन कार्यरत होता . त्यांना तीन मुले त्यात त्यांची जया ही मुलगी मोठी असल्यामुळे तिचे लग्न थोडे लवकरच झाले होते, त्यांना जावई  देखील खूप चांगला मिळाला होता . आणि सीताचा एक मोठा मुलगा उत्तम शेती सांभाळत आणि सर्वात लहान  मुलगा  जो होता तो मिल्ट्रीत भरती साठी ट्राय  करत असे . असे तिचे गावातील एक सुखी कुटुंब अतिशय आनंदाने नांदत होते .  तसे पाहिले तर सीतासाठी कुटुंब हेच तिचे सर्वस्व आणि सर्वकाही होते.  पण म्हणतात ना "सुखी संसाराला कुणाची दृष्ट ना लागो . !"  नेमके सीताच्या बाबतीत हेच झाले . . पतीच्या पोटात अचानक दुखू लागले, त्यांना खूप  वेदना होऊ लागल्या   म्हुणुन त्यांना शहरच्या एका दवाखान्यात ऍडमिट केले . . त्याचे निदान असे आले कि अपेंडिक्स फुटून त्याचा स्त्राव पूर्ण पोटात पसरलेला आहे . . आणि दवाखान्यात आणण्यास खूपच उशीर झाला आहे . . तेंव्हा त्याच आजाराने सीताच्या पतीचा अखेर बळी घेतला दवाखान्यात साधारपणे पाच ते सहा दिवस उपचार चालले पण डॉक्टरांना शेवटी यश  काही  केल्या आले नाही .  सीताचा  पती इहलोकीची यात्रा संपवून सीताला सोडून कायमचे निघून गेले.  इकडे  तेही दुःख सीताने  काही दिवसात पचवले पण सीताच्या पुढे नियती काही वेगळाच डाव खेळणार होती . . आणि बिचार्या सीताला याची पुसटशी देखील कल्पना नव्हती.  नवरा गेल्याचे दुःख पचवत सीताने आपल्या मोठ्या मुलाचे कसेबसे तरी लग्न जमवले . मुलाचे लग्न झाले सीताच्या घरी नवीन लक्षमी सारखी सून अली , नवीन सुनेच्या सहवासात सीता आपला नवरा गेल्याचे दुःख विसरली आणि परत त्याच जुन्या जोमाने आणि हिमतीने संसाराला लागली . . पण पण नियतीला हे तिचे आनंदी रहाणे पसंद नाही आले .  तिचा लहान मुलगा शाम  जो सैन्यातभरती साठी प्रयत्न करीत होता तो सीताचा अतिशय लाडका शाम होता . . त्याला अति व्यायाम आणि अतिरनिंग याचा परिणाम  श्यामच्या मेंदूवर झाला त्याला ब्रेनस्ट्रोक चा झटका बसला आणि मेंदूतील नसा फुटून मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन शाम कोमात गेला .  तो आता  परत कधी न उठण्यासाठीच कायमचाच . . त्याला शहराच्या  एका मोठ्या नामवंत  दवाखान्यात ऍडमिट केले गेले, पण उपचाराला त्याने शेवटपर्यंत काही साथच नाही दिली आठ दिवस उपचार चालू होते . पण शेवटी सीताचा  लाडका शाम सीताला सोडून कायमचा निघून गेला.  सीता आता पुरती कोलाडमडली हातातोंडाशी आलेला घास असा अचानक कुणीतरी हिरावून न्यावा तसेच सीतेच्या बाबतीत घडले. लाडका शाम असा अचानक निघून जाणे आणि हे दुःख पचवणे सीतेसाठी खूपच वेदनादायी होते .  शाम आता काही दिवसातच मिळवता झाला असता असा मुलगा . सीतेचं लाडकं प्यार असं  अचानक बापानंतर आईला सोडून निघून गेलं होत . पण इकडे नियती सीतेचं  सतपण पावलो पावली घेतच  होती, नियती सीतेपुढे अनेक डाव सोडत होती  . . नियतीने सीतेचा कठोर परीक्षा घ्यायची असा जणू चंगच बांधला होता . .  झाले,  उणेपुरे शामला जाऊन आता सहा एक महिने झाले असतील सीतेच्या घरात एक आनंदाची बातमी अली . सीता आता आज्जी होणार होती . झालं सीतेचा आनंद आता गगनात मावेना . नवऱ्या पाठोपाठ लाडक्या मुलाचे असे आकस्मित जाणे सीतेने पचवले आणि आता नवीन आनंदाची स्वप्ने पाहण्यात ती रमून गेली .  पण इकडे सीतेला आनंदी पाहून नियती चांगलीच  खवळली हि इतकी दुःखे इतक्या लवकर कशी सहज पचवू शकते . . हे पाहून नियती देखील अचंबित झाली , तिने अजून कठोर होण्याचे ठरवले  . . आणि तिने सीतापुढे तिसरा डाव खेळाला . . सीतेचा थोरला मुलगा जो बाप होणार होतात त्याचे आणि त्याच्या बायकोचे काही तरी बिनसले आणि किरकोळ कारणातून सीतेचा मोठा मुलगा . . भैरवने कीटकनाशक प्राशन  करून तो देखील आपल्या वडील आणि भावाच्या दिशेने निघून गेला . .  हे इतक्या जलद झाले कि कुणाला श्वास घेण्याची देखील नियतीने उसंत नाही दिली . त्याचे झाले असे . .  भैरवने रात्रीचे जेवण केले आणि आईला म्हणजे सीताला तो म्हणाल कि आई मी शेतात जाऊन जरा ज्वारीला पाणी लावून येतो . . पण ह्याच्या मनात आज काही वेगळेच खेळ  चालले होते . . तो शेतात गेला आणि सोबत आणलेली कीटकनाशकची अख्खी बॉटल ह्याने पिऊन टाकली . . आस- पास कोणी नसल्यामुळे त्याने तेथेच शेतात तळमळून तळमळून जीव सोडला होता .  ही  बातमी जेंव्हा सीतेला कळली तेंव्हा ती पुरती  कोसळली . . इकडे सून माहेरी गेली होती जेंव्हा तिला हि भैरवच्या  आकस्मित गेल्याची  बातमी कळली तेंव्हा तीला जोरदार मानसिक धक्का बसला त्यातच तिला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिची म्हणजे सीतेची सून  सायलीचे प्राणज्योत मालवली .  गावात एकाच  सरणावर भैरव आणि सायलीला भडाग्नी देण्यात आला . . त्यांचा सोबत एक उमलणार नवा अंकुर सायलीच्या पोटी  होता त्याने देखील हे जग पाहण्यागोदरच ह्या जगाचा निरोप घेतला  होता . . सीता  तर आता भरल्या संसारातून पुरती उठली होती . . पतीचे दुःख पचवले त्यानंतर लगेच दोन वर्षांनी लाडका मुलगा शाम ह्याला नियतीने हिरावून नेलेले लगोलग वर्ष सहा महिन्यात . . थोरला मुलगा भैरव आणि आणि सून सायली ह्यांना देखील नियतीने अलगत उचलून नेले होते .  सीता आता गावात एकटीच असते . नाही म्हणायला कधी अधेमधे मुलगीकडे जाते , अजून जगण्याची लढाई सीता त्याच जोमाने लढते आहे . . आणि शेवटी नियतीला एका प्रश्न विचारते  कि , अशी काही हि कर्म  कहाणी   माझ्या जीवनाची . .  . ?? तेंव्हा सीतापुढे नियती नतमस्तक होते, नियतीला देखील पश्चताप होत  असावा आता . . कारण सीता अनेक दुःखे पचवून देखील त्याचा संयमाने आणि त्याच जोशाने जीवनाचा गाडा न कुर कुर करता  आज देखील ओढते आहे .  +समाप्त + टीप : कथा पूर्णतः  काल्पनिक आहे , 

Thursday, November 28, 2019

कर्ण 

कर्ण, कर्णाची बाजू सत्याची कि असत्याची माहित नाही.  पण एक मात्र खरे सारे जग विरोधात असताताना  तो आपल्या मित्राची बाजू घेऊन त्याचे पाठीशी ठाम उभा होता . हाच खरा त्याचा कर्तृत्वपणा  नाही का ? कारण आपल्या कठीण पडत्या क्षणी ज्यांनी ज्यांनी आपल्याला हात दिला,  साथ दिली त्यांच्या सोबत तुम्ही नेहमी रहा.  अगदी तुमचा त्यामध्ये शेवट होणार असेल तरी माघार नको हीच शिकवण  दानशूर कर्ण  आपल्याला त्यांचा आचरणातून शिकवून जातो . . म्हणूच तो असत्याचा बाजूने जरी उभा असला तरी . . तसा  मित्र दुर्योधन याना  लाभणे हे देखील त्यांचे भाग्यच नाही का ? कारण असा मित्र अर्जुनाला  श्रीकृष्ण सोडले तर कुठे लाभला होता . . ?? गजानन रा. माने दिनांक २८. ११. २०१९

Wednesday, November 26, 2014

वेडीवाकडी वळणे

एखाद्या घाटातून जाताताना . .वाहने सावकाश हाका असे फलक हमखास पाहायला भेटतात . . हे सावधानतेच सुचकच असते. पण,जीवनाची गाडी हाकताना अशीच वेडीवाकडी वळणे जीवनाच्या रस्त्यावर येतात . आपला पुढचा प्रवास नीट आणि सुखकर व्हावा असे वाटत असेल तर थोडे वाकडे व्हावेच लागते परस्थितीनुसार. तरच उचित ध्येयास आपण पोहचू शकतो, नाही का ?

Friday, November 21, 2014

शेवटची भेट

"काल  माझ्याकडे आली ती मला  शेवटचे भेटण्यासाठी
दाबून ठेवलेल्या हुंद्क्याना मोकळीवाट करून देण्यासाठी."
ती : परत तू प्रेमात पडशील.
मी : निर्जीव देह फक्त जाळण्याच्याच कामाचा
@ गजानन माने.

Saturday, September 28, 2013

परतून देशील का ती नजर प्रेमात परत पडायला .


ओशाळल्या नजरेला 
परत प्रेमाची आस नको 
तुटलेल्या त्या मनाला 
 परत प्रेमाचा भास नको 
वास तर येतो फुलांचा 
पायदळी तुडवता 
चुरगळलेल्या त्या फुलांना 
परत कसलीच आस  नको 
नाहीच आठवण काढली कुणी तरी
मनातून  दुखाचा ठाहो नको 
सगळ काही संपले तरी 
इतरांना संपवण्याची भाषा नको 
परत परत प्रेमात पडण्याची 
मनाला त्या आता नशा   नको 
@ गजानन माने .  २१. ०९. २०१३


Sunday, September 15, 2013

आठवणीत विरलेली एक सायंकाळ.

बरसणारा वेडा  पाऊस ,चिंब भरून येणारे डोळे 
आता सगळे काही शांत शांत होते . 
कारण तू तेथे सावरायला नव्हतीस ना म्हणून. . !  
 तेंव्हा तुझ्या आसण्याने रडण्याला देखील अर्थ होता,
हल्ली तर आठवणींचा गुंता आणखीनच वाढतोय 
अन असंवे पाण्यासारखी वहातात .
 गालावरील ते थेंब तसेच नकळत विरून देखील जातात. . . . . !!
सगळे काही तुझ्या जाण्याने हिरावून नेले आहे. 
सगळ सगळ ते दुरावल आता माझ्या पासून . . 
फक्त माझ्यासाठी  माझ्याकडे  माझे दुख मागे ठेवून . . . 
@ गजानन माने .  १५. ०९. २०१३