Thursday, November 28, 2019

कर्ण 

कर्ण, कर्णाची बाजू सत्याची कि असत्याची माहित नाही.  पण एक मात्र खरे सारे जग विरोधात असताताना  तो आपल्या मित्राची बाजू घेऊन त्याचे पाठीशी ठाम उभा होता . हाच खरा त्याचा कर्तृत्वपणा  नाही का ? कारण आपल्या कठीण पडत्या क्षणी ज्यांनी ज्यांनी आपल्याला हात दिला,  साथ दिली त्यांच्या सोबत तुम्ही नेहमी रहा.  अगदी तुमचा त्यामध्ये शेवट होणार असेल तरी माघार नको हीच शिकवण  दानशूर कर्ण  आपल्याला त्यांचा आचरणातून शिकवून जातो . . म्हणूच तो असत्याचा बाजूने जरी उभा असला तरी . . तसा  मित्र दुर्योधन याना  लाभणे हे देखील त्यांचे भाग्यच नाही का ? कारण असा मित्र अर्जुनाला  श्रीकृष्ण सोडले तर कुठे लाभला होता . . ?? गजानन रा. माने दिनांक २८. ११. २०१९

No comments:

Post a Comment

सावळेपण

नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...