Wednesday, October 16, 2024

हरवलेले एक पान.

सागर आणि ऋतिकाची हि प्रेमकहाणी . . . हरवलेले एक पान . . सागर एक खाजगी आस्थापनेतील कंपनीत जेमतेम पगारावर नोकरीस असलेला . . आणि ऋतिका हि एक शिक्षक दांपत्याची मुलगी . संगीत गायन आणि चित्रकला यात विशेष रस असलेली . . .. दूरदेशी असलेल्या ऋतिका आणि सागर यांची नियतीने अशी . . काही भेट घातली कि . दोघे काही कालावधी साठी एकरूप झाले . . म्हणायला तसे दोघांची प्रत्यक्षात कधीच भेट झाली नव्हती पण . .दोघांची ओळखीचे माध्यम फेसबुक . . .आणि त्यावरील गप्पा गोष्टीतून . . एकमेकांचे विचार जुळले . . . एकमेकांचे मोबाईल नंबर एकमेकास शेहर केले गेले . . आणि फोनवरील गप्पा गोष्टीतून . . विचारातून हे दोघे एकमेकात इतके गुरफटले कि . . नंतर नंतर तर दो दिल एक जान . . .! एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी हि कहाणीची सुरवात . . . . .ऋतिकाचा आवाजच इतका मधुर . . ती अधून मधून . . सागरला गाणी ऐकवी . . कधी हार्मोनियम वर एखादे सुमधुर संगीत वाजवून दाखवी . . . तिचा आवाज , तिचे बोलणे . . हे सगळे सागर कित्येक दिवस पहात आणि ऐकत होता . . .! त्यातून सागर तिच्या प्रेमात हळू हळू गुरफटू लागला . . पण तेंव्हा सुरवातीला ऋतिका हि सागरला एक चांगला मित्र मानत होती .आणि काही दिवसांनी न राहून शेवटी एक दिवस सागरने तिच्यापुढे फोनवर आपल्या प्रेमाची कबुली दिली . . असे अचानक सागरचे बोलणे हा एक तर तिच्यासाठी अतिशय अविश्वसनीय असे होते . . तिला हे ऐकून धक्काच बसला . . . पण त्याचा . . चांगुलपणावर . . विस्वास ठेवून तिने त्याला . . असेच हो म्हंटले . . पण मनापासून नाही . . . तेंव्हा त्यावेळी सागरच्या ह्या विचित्र प्रपोझल ने ऋतिका थोडी शॉकिंगच झाली होती . . पण पुढे पुढे दोघांचे फोनाफोनी इतकी वाढली कि . . सुरवातील वर वर होय म्हणारी ऋतिका नंतर नंतर सागरच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली कि . . . . एक दिवस आणि एक क्षण पण असा जात नसे कि एकमेकांचे फोनवर बोलणे होत नाही असे कधीच होत नसे . .. हे इतके मनस्वी प्रेम करणारे हे सागर ऋतिका . . हे जणू काही एक दुजेकेलिये . . बनले गेले आहेत कि काय असे . . वाटत . . आणि चित्रपटातील हिरो हिरोईन एक होऊन चित्रपट संपतो . . पण इथे काही वेगळेच झाले . . . आपल्या आईवडिलांच्या आज्ञेविरोधात नाजाणारी ऋतिका एक दिवस तिच्या आई वडिलांनी पसंद केलेल्या मुला सोबत लग्न करून दूरदेशी निघून गेली . इकडे सागर पण काही दिवस . . तिच्या विरहात अस्वस्थ आणि शांत शांत राहिला पण त्याने ऋतिकाला कधीच दोष दिला नाही . . त्यानें तर तिला अभिमानाने सांगितले . . . जेंव्हा शेवटचा ऋतिकाचा कॉल आला तेंव्हा हृतिक सागरला म्हणाली . . माझे लग्न ठरले आहे रे . . . . हे सांगताना तिचे अंतःकरण खूपच जड झाले होते . . पण मी आई वडिलांच्या जो समाजात मान आहे तो नाही दुखावू शकत . . . मला माफ कर . . . हे ती भरल्या डोळ्यांनी आणि जड मनाने हृतिक सागराला फोनवर सांगत होती . तेंव्हा सागर उतरला . . असूदेत ग आपल्या मनाचा आणि सोबतीचा प्रवास हा इथपर्यंतच . . . पण एक सांगतो जातेस तर निघून जा .सुखी रहा . . आणि देवाकडे माझ्यासाठी एकाच मागणे माग. . . "भविष्यात कधी माझे लग्न होईल तेंव्हा मला . . पहिले अपत्य मुलगीच होवूदेत . . आणि ते तुझ्यासारखेच असूदेत . ." जे कि आपल्या आई वडिलांचा समाजात मान राखेल . . जे आईवडिलांची मन कधी खाली जाऊ देणार नाही . . . . आई वडिलांना दुखावून कोणीच सुखी नाही राहू शकत . . ना तू. . . . ना मी . शेवटी हरवलेले सागरच्या मनातील एक पान . . हरवलेलेच राहील. इकडे सागर आपल्या संसारात सुखी आणि तिकडे ऋतिकाआपल्या संसारात सुखी . . हल्ली नाही म्हणायला एखादा मॅसेज असतो फोनवर आणि त्यातूनच एक मेकांची ख्याली खुशाली विचारली जाते. . . . समाप्त . . कथा काल्पनिक आहे . . .

No comments:

Post a Comment

सावळेपण

नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...