Tuesday, October 15, 2024

गावातील तरुण मंडळे आणि त्यांची वाटचाल.

हि गोष्ट आहे साधारपणे . . २० ते पंचवीस वर्षपूर्वीची . . आमच्या गावातील मंडळांची. *गणेश चतुर्थी म्हंटले कि , चर्चा चालू होते ती आपसूक गावातील तरुण मंडळांची  त्यातील काही मंडळे काळाच्या ओघात बंद पडली.  तर काही नवीन उदयास अली.  तर काही मंडळे वर्षानुवर्षे टिकून , आपले स्वतंत्र अस्तित्व  आणि आपले वेगळेपण अबाधित ठेवून आहेत त्यातीलच काही हि खालील तरुण  मंडळे.  आणि त्यांचे वैशिष्टय थोडक्यात.  *श्री . महालक्ष्मी तरुण मंडळ* स्थळ : एस टी स्टॅन्ड महालक्ष्मी मंदिर आप्पाचीवाडी गावातील सर्वात जुने मंडळ , वेगवेगळ्या कला कृती.  आणि सजीव देखाव्यातून आपली कला सादर करणारे हे एक गावातील सुप्रसिद्ध मंडळ . यांचा चलेजाव चळवळीतील सजीव देखावा आणि वारकरी दिंडी हे देखावे चिरकाल स्मरणात राहणारे असे आहे . गावातील कलाकारांच्या कलेला चालना देणारे हे एक उत्कृष्ट मंडळ आहे असे मंडळ  अद्यापही आपले वेगळेपण आणि नावीन्य टिकवून आहे . *जय शिवराय तरुण मंडळ* स्थळ : श्री हालसिद्ध नाथ मंदिर (वाडा ) व भागीरथी देवी मंदिर आप्पाचीवाडी. गावातील एक पौराणिक देखावे सादर करणारे असे हे एक प्रसिद्ध मंडळ . पण काळाच्या ओघात हे मंडळ आपले अस्तित्व टिकवू शकले नाही . सध्या बोर्ड रूपाने ह्या मंडळाच्या स्मुर्ती  तेवढ्या अस्तित्वात आहेत .     *न्यू गणेश तरुण मंडळ.* स्थळ : लोहार गल्लि  आप्पाचीवाडी .  मर्यादित सभासद संख्या असलेले  पण नावीन्य पूर्ण  सजीव देखावे सादर करणारे गावातील एक नावाजलेले मंडळ.  कालानुरूप आपल्यात बदल करून सध्या दिमाखात उभे असलेले हे एक गावातील नामवंत  असे तरुण मंडळ .  *शाहू तरुण मंडळ*  स्थळ : माने गल्ली आणि पोटले गल्ली , आप्पाचीवाडी .    नावाप्रमाणे शाहू महाराज यांचा विचारांचा वारसा जपणारे गावातील एक जुने जाणते मंडळ म्हणजे शाहू तरुण मंडळ ,छत्रपतींचे मर्दानी खेळ साजरे केले ह्याच मंडळाने . . आणि लोककला लावणी देखील साजरी केली ह्याच मंडळाने . . आणि एकवर्षी तर ढकलगाडीवरून श्री गणेशाची मिरवणूक काडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील ह्या मंडळाने दिला . असे हे   मंडळ आजही हे मंडळ आपले अस्तित्व अगदी दिमाखात टिकवुन आहे *अष्टविनायक तरुण मंडळ.*  स्थळ : कुंभार , आबणे  आणि गारगोटे  गल्ली , आप्पाचीवाडी .  सामाजिक बांधिलकी जपणारे असे हे एक गावातील वैशिष्ठपूर्ण मंडळ. आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आज दिमाखात उभे आहे .   *सिद्धीविनायक  तरुण मंडळ.*  स्थळ : कुंभार गल्ली , आप्पाचीवाडी .   अष्टविनायक तरुण मंडळ   याची फाळणी होऊन निर्माण झालेले हे एक तरुण मंडळ . आपले वेगळेपण आणि अस्तित्व टिकवून आजदेखील तितक्याच तत्परतेने अस्तित्वात आहे .  *जयभीम तरुण मंडळ.*  स्थळ : भीमनगर , आप्पाचीवाडी . डॉ . बाबासाहेबांच्या विचाराचा पूर्वापार चालत आलेला वारसा जपत चालू असणारे हे एक गावातील प्रतिष्ठित मंडळ . आपले  अभेद्य विचार आणि आचार अबादित राखून आजही  दिमाखात अस्तित्वात  आणि उभे आहे .  *शिवप्रेमी तरुण मंडळ.* स्थळ : पेठ गल्ली  , आप्पाचीवाडी. ऐतिहासिक आणि पौराणिक देखावे सादर करणारे कधी काळाचे गावातील सुप्रसिद्ध मंडळ . . भीष्मपितामह, अंतराळ तरंगणारे  साधू, रांज्यांचा पाटील, छत्रपती संभाजी महाराज, भीमाचे गर्वहरण  असे अनेक चिरकाल स्मरणात रहाणारे  सजीव देखावे ह्या मंडळाने सादर केले पण असे हे प्रसिद्ध मंडळ  काळानुरूप नामशेष झाले आज फक्त बोर्ड रूपाने त्याचे अस्तित्व आहे . मंडळ तर कधीच बंद झाले आहे .  *बाल  गणेश  तरुण मंडळ.*  स्थळ : खडक चौक , आप्पाचीवाडी. कधी काळी लहान मुलांनी  चिकलि गणपती बनवून सुरवात केलेलं हे एक छोट मंडळ आज एक महान अश्या वटवृक्षात रुपातन्तरित झालेलं आहे . वेगवेगळे समाजीक उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जपत हे मंडळ आज देखील पूर्वीच्याच जोशात आपले  अस्तित्व टिकवून आहे .  *फ्रेंड सर्कल*  स्थळ : सर्कल , आप्पाचीवाडी. गावातील एक सर्वात तरुण  आणि अल्पावधीत प्रसिद्धी पावलेले असे हे  मंडळ . अनेक उपक्रमांनी नावारूपास आणि प्रसिद्धीस  येताना दिसत आहे .  *संभाजी  राजे  तरुण मंडळ*  स्थळ : संभाजी नगर , आप्पाचीवाडी. कधी काळी सुप्रसिद्ध  असणारे हे गावातील एक नामवंत  मंडळ . . मध्यंतरी काही कालावधी साठी लोप पावले होते . पण जुन्या कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने परत ते उभे करून परत नावारूपास आणले आहे . सध्या हे मंडळ जुन्या काळात जसे प्रसिद्ध होते तसेच आज देखील अगदी नावीन्य पूर्ण उपक्रमाने भरभरून असे  उभे आहे .  अश्या सर्व तरुण मंडळांना .. गणेश चतुर्थी पुरते मर्यादित न रहाता विविध सामाजिक उपक्रम राबवून  आपल्या *आप्पाचीवाडी* गावाचे नाव उज्वल करतील अशी .. *श्री चरणी प्रार्थना* आणि त्यांच्या  पुढील वाटचालीस भरभरून मनापासून खूप खूप  शुभेच्छा .  ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ गणेश चतुर्थी म्हंटले कि,* आमच्यासाठी पर्वणी असायची . . विशेष आकर्षण असायचे ते गणपतीत मंडळाकडून उभे केले गेलेले सजीव देखावे . ते पाहणे व त्याची मज्जा काही औरच होती . . दुसऱ्यादिवशी गावात आणि गल्लीत बायाबापड्यात चर्चा रंगायची कि, कालचा कुणाचा देखावा एक नंबर होता . . त्या काळी होते ते सगळे एक नंबरच . . दोन नंबर असे काही अस्तित्वातच नव्हता. गणपतीत सादर केले जाणारे देखावे यामध्ये सादरीकरणापूर्वी कमालीची गुप्तता पाळली जायची कोणत्या दिवशी कोणता देखावा सादर होणार हे त्या मंडळातील फक्त कार्यकर्त्यास सोडून गावातील कोणाला याची छोटीशी चुणूक देखील नसायची . . . *मंडळाच्या गणपतीची वर्गणी देखील देणे नजमणारी अशी हि आमची पिढी होती* . .त्यामुळे पुंगळ्या कडून बाईक रॅली असे काही करायचे असते याची पुसटशी कल्पना देखील नसलेली आमची पिढी . . डॉल्बीच्या धागडधिंगा पासून कोसो दूर असणारी आमची पिढी, मिरणुकीच्या नावाखाली . . धुडगूस न-घालणारी आमची पिढी . . गणपतीला देव मानून . . त्या गणरायाला घाबरून असणारी व त्या गणरायाची मनोभावे सेवा करणारी आमची पिढी . . तेंव्हा मंडळाचे गणेशमूर्ती तसे छोटेच असायचे . ठराविक मंडळ मात्र मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करायचे . . बाकीच्या मंडळांची मूर्ती जरी छोटी असली तरी कारकर्त्यांचा उत्साह आणि मन मात्र आभाळाएवढ मोठं असायच . . कार्यकर्ते तहानभूक हरपून मंडळाच्या कार्यात स्वतःला झोकून द्यायचे . . इतर मंडळा पेक्षा आपले मंडळ कसे सरस होईल अशी एक वेगळीच इर्षा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात रुजलेली असायची . . मात्र कुणाच्या मंडळाबद्दल कोणत्या कार्यकर्त्या बदल असूया मात्र मनात अजिबात नसायची . . त्यावेळी मंडळाच्या सजीव देखाव्यामध्ये सहभागी असण्याऱ्या प्रत्येक कलाकार मंडळींना काल रात्री केलेलं पात्र या नावाने दुसऱ्या दिवशी गावातील लोकांच्या कडून हाक मारली जायची त्यामुळे अश्या कलाकारांचा तेंव्हा रुबाब काही औरच असायचा . काही कार्यकर्ते तर महिनोमहिने . . त्या पात्रातून बाहेर यायचे नाही . ते उत्साहचे वातावरण काही औरच होते . . कधी कधी तो तिला पाहण्यासाठी म्हणून *कारण त्यावेळी आजच्या सारखे मोबाईल नव्हते त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे तेंव्हा कुणाच्या स्टेटसला कधीच धक्का लागला नाही.* *कोण कुणाचा स्टेट्स पहाण्याचा भानगडीत देखील पडले नाही.* म्हणून तर कार्यकर्ते मंडळाचे काम ते आपले घरचेच काम समजून .. त्यात . तनमन झोकून देऊन . . ते काम तडीस न्यावयाचे . . तसेच गणपतीला नवीन लग्न झालेली माहेरवाशीण . . माहेरी यायची . . आणि लग्नाआधी जी आपल्याकडे कधी पहायची देखील नाही . . ती कुठे भेटली तर ती आपुलकीने चौकशी करायची . . पण हल्ली काळ बदलला . . काळ पुढे सरकला . . . आता लोक भौतिक जगातून व्यावहारिक जगात प्रवेशले गेले तसे जी कार्यकत्यात असणारी आपुलकी आणि उत्साह थोडा का होईना पण कमी होत चालला लोप पावत चालला . . जो तो आपल्या व्यावहारिक विश्वात रमून गेला . . . . . सगळे ऍटोमॅटिक झाले . . सगळे रेडिमेड आले . . आणि पूर्वीचा आनंद हल्ली लोक विसरत चाललेत . ... *@लेखन गजानन रा माने.*

No comments:

Post a Comment

सावळेपण

नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...