Sunday, September 15, 2013

आठवणीत विरलेली एक सायंकाळ.

बरसणारा वेडा  पाऊस ,चिंब भरून येणारे डोळे 
आता सगळे काही शांत शांत होते . 
कारण तू तेथे सावरायला नव्हतीस ना म्हणून. . !  
 तेंव्हा तुझ्या आसण्याने रडण्याला देखील अर्थ होता,
हल्ली तर आठवणींचा गुंता आणखीनच वाढतोय 
अन असंवे पाण्यासारखी वहातात .
 गालावरील ते थेंब तसेच नकळत विरून देखील जातात. . . . . !!
सगळे काही तुझ्या जाण्याने हिरावून नेले आहे. 
सगळ सगळ ते दुरावल आता माझ्या पासून . . 
फक्त माझ्यासाठी  माझ्याकडे  माझे दुख मागे ठेवून . . . 
@ गजानन माने .  १५. ०९. २०१३

No comments:

Post a Comment

असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!

“असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!” खऱ्या माणसांची नेहमी गळचेपी होते… त्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो. पण गंमत अशी आहे की, अनेकदा आपला ...