एकीकडे सौंदर्याची खान आणि जगाचा वा ...वा ...!! तर दूसरी कड़े किळसवानेरूप तूच बनवतोस. सौंदर्याकड़े पहावे की किळसवान्यारुपाकडे, तरी त्या पहाण्यात विसंगति आहेच ना रे ..!! मग मला सांग हे जग सुन्दर कसे ......??? एकीकडे भयानक दुःखाचे पहाड़ अणि एकीकडे आनंदी महल ही विसंगति तूच निर्माण केलिस ना?? दुखी पहाड़ पण तूच बनावितोस अणि आनंदी महल देखिल तूच मग दुखी पहाड चढायचे की आनंदी महालात बागडायचे ?? चढवणे आणि बागडवने देखील तुझ्याच हातात, मनात नसताना ह्यापैकी एक करावेच लागते ना..!! मग मला सांग हे जग सुन्दर कसे ..??? वादविवाद अडचणी नसतात कुठे सगळी कडे त्या असतातच हें मान्य. पण एकटा वाद करणार आणि त्याचा त्रास दुसर्याला का होतो ..?? त्या दुसर्याने त्याची चूक काही नसताना हें का सहन करायचे कितीवेळा आणि कुठवर याला कुठेतरी पूर्णविराम पाहिजेच ना . पण मला तो कुठेच दिसत नाही. दिसतो तो फक्त स्वल्पविराम म्हणजे एका अडचणीतून बाहेर पडलो की दुसरी स्वागतास तयारच आसते. या दुखाचे कुठवर स्वागत करायचे. आता नाही सहन होत रे हें सगळे , खुप होते मनाची घुसमट. जगणे आता असह्य वाटते, दुखात खितपणारे जीवन हें कायमचे असेल तर हें जगणे मग काय कामाचे . मी फक्त खेळणे बनून राहायचे का तुझ्या खेळातील एक ज्याला कसलाच अधिकार नसतो आणि ते खेळणे गेले म्हणून काही खेळ थांबणार देखील नसतो. मग का राहावे त्या खेळण्याने त्या डावात त्याला डावात येण्याचा जसा अधिकार आहे तसा बाहेर जाण्याचा देखील अधिकार पाहिजेल ना मग. म्हणून मी ते तुझ्या ह्या खेळला कंटाळून संपवले तर मग ?? ते पाप कसे तूच सांग आता ते पाप कसे ते..!!.. गजानन माने.
"ज्यांच्या उदरात आकार घेत मी या जगात आलो, ज्यांच्या प्रेमातूनच श्वासाला अर्थ मिळाला, ती माझी जन्मदात्री – आई... आणि ज्या भाषेत मी पहिल्यांदा 'आई' म्हणालो, जिच्या अंगाई गीतात , शब्दांत मला उब सापडली, ती माझी मातृभाषा – मराठी… या दोघींच्या ऋणात मी जन्मभर बांधलेलो आहे, कारण त्यांनीच मला जगायला आणि बोलायला शिकवलं… त्यांच्या चरणीच माझा हा छोटासा ब्लॉग, मनापासून समर्पि "आई आणि मातृभाषा – या दोन गोष्टींचं ऋण शब्दांनी फेडता येत नाही… पण हा छोटासा प्रयत्न त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी."
Subscribe to:
Post Comments (Atom)
सावळेपण
नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...
-
पानिपतनंतर मराठ्यांचे पुनरागमन : खरा इतिहास (१७६१–१७७१) १७६१ साली तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. हा पराभव केवळ लष्करी...
-
मी कधी तुझ्यासमोर काही बोललो नाही, पण मनाने मात्र प्रत्येक भावना ओरडून सांगितली होती. तू त्यातील कदाचित कधीच काही समजली नाहीस, पण मी मात्र ...
No comments:
Post a Comment