जरी घडी घडी तु मला भिजवत राहिलीस
तरी मी किनार्याप्रमाणे कोरडाच राहिलो
तु मला परतणाऱ्या लाटे प्रमाणे सोबत दिलीस
त्या लाटेसोबत मला तुझ्यात विलीन व्हायचे होते.
प्रेमाने उसळू पहाणार्या तुझ्या त्या हृदयाला
मज हृदयात खोलवर कायमचे सामावयाचे होते.
मनातील गीत बनुनी तुझ्यासवे ते गायचे होते.
भरकटलेल्या गलबताप्रमाणे खोलवर जायचे होते .
आता एक अनामिक हूरहूर मनी तशीच राहुनी गेली
जी पहिली स्वप्ने मी ती किनार्यावरती तशीच विरली
@गजानन माने.
"ज्यांच्या उदरात आकार घेत मी या जगात आलो, ज्यांच्या प्रेमातूनच श्वासाला अर्थ मिळाला, ती माझी जन्मदात्री – आई... आणि ज्या भाषेत मी पहिल्यांदा 'आई' म्हणालो, जिच्या अंगाई गीतात , शब्दांत मला उब सापडली, ती माझी मातृभाषा – मराठी… या दोघींच्या ऋणात मी जन्मभर बांधलेलो आहे, कारण त्यांनीच मला जगायला आणि बोलायला शिकवलं… त्यांच्या चरणीच माझा हा छोटासा ब्लॉग, मनापासून समर्पि "आई आणि मातृभाषा – या दोन गोष्टींचं ऋण शब्दांनी फेडता येत नाही… पण हा छोटासा प्रयत्न त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी."
Thursday, December 22, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
सावळेपण
नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...
-
पानिपतनंतर मराठ्यांचे पुनरागमन : खरा इतिहास (१७६१–१७७१) १७६१ साली तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. हा पराभव केवळ लष्करी...
-
मी कधी तुझ्यासमोर काही बोललो नाही, पण मनाने मात्र प्रत्येक भावना ओरडून सांगितली होती. तू त्यातील कदाचित कधीच काही समजली नाहीस, पण मी मात्र ...
No comments:
Post a Comment