Search This Blog

Sunday, September 25, 2011

खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ ...!!!


काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ,
आपल्या विरहातिल गेलेले क्षण एकदा मोजुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

गळुन पडलेल्या झाडाच्या एका-एका पाना कडे बघ,
जीव लावून जगवलेल्या झाडाला एकदा मरताना बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

जीवनात मिळालेल्या सुख-दुःखाची
बेरीज करुन बघ,
बाकी काहीच उरले नाहि याचा अंदाज घेवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

मुसळधार पावसात विस्कटलेल्या घराकडे बघ,
माझ्या जीवनरुपी आकशात दुःखाच्या विजेचा तांडव एकदा बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

स्वतःच्या जिवंतपणी मॄत्युला डोळ्या समोर बघ,
तो हि लवकर येत नाहि म्हणुन खंत करणाऱ्या माझ्या मनाकडे बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

खरंच तुझ्या प्रेम भंगाने मी किती तुटुन पडले आहे हे समजण्या
साठि...
एकदा माझ्यावर मनापासुन खरे प्रेम करुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

प्रेम भंगाने मला लागलेल्या झळा एकदा तु पण अनुभवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,
लेखक कवी ...अज्ञात



Tuesday, September 20, 2011

चार अंतरओळ्या



पूर्णपणे होरपळलोय आजवर मी
अजून काय काय जाळणार तु .
करपलेल्या त्या मनाला माझ्या
आठवणीच्या तेलात का तळणार तु।

खोल तुझ्या डोळ्यातील अश्रू सागरात
पूर्वीच खूप खूप मसोक्त डुंबणे झाले.
विरहाच्या गटकाळ्यात आता मला
आयुषभरासाठी आता झुंजणे आले ।
टकमक टकमक डोळ्यांनी तु
अशी आता मला पाहू नकोस.
पाहून इकडे चोरट्या नजरेने
पूर्वीच्या वेदना तु देवू नकोस।
बोलने आता मी सोडले आहे
मनाला तुजया टोचेल असे
शब्दाच शिल्लक नाहीत मजकडे
कदाचित तुला रुचेल असे।
बाकी काय आता शिल्लक राहिली
जेंव्हा जेंव्हा मी मागे वळून पाहिले
मिळालेल्या त्या आनंदी भूकटीवर
तुझ्या विरह आठवणीचे व्रण राहिले।

वाटते मला आता एक मैत्रीण पाहिजे
मनाच्या खूप अगदी जवळ पोहचणारी
ती अशी मनमिळाऊ सामंजस्य सखी पाहिजे
सुखदुखात साथकरेल इतकी तीझ्यात नेकी पाहिजे।

नियमित भिरभिरणारा पतंग मी
मज दिव्याचा ज्योतीची आस आहे
कश्याला कोणी सांगावे कधी शेवट माझा.?
ज्योतीची आस धरणेच हा खरेतर ...!!
माझ्यासठी कायमचा विनाश आहे

@गजानन माने

Tuesday, September 13, 2011

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!
रात्रि झोपेतून दचकून मी जागा होतो,
अणि या अंधारात तुला शोधायचा प्रयत्न मी करतो,
हताश होउन पुन्हा झोपायचा प्रयत्न मी करतो,
तेवढ्यात एक अश्रु डोळ्यातून गालावर ओघळतो,
सुरु होतो आठावनिचा तो खेळ,
नाही रहात पुन्हा झोपायचा ताळ -मेळ,
असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करावे,
त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे,
आणि स्वप्नाच्या दुनियेत बांधलेले घर,
खाडकन फुटावे,
कुठे कमी पडत होतो,
प्रत्येक वेळी तुलाच तर समजुन घेत होतो,
तुझ्यावर येणार्या संकटाना,
परतीचा रस्ता मी दाखवत होतो,

तू केलेल्या प्रत्येक चुकावर,
माफ़ी मी मागत होतो,
तुझ्या चुकानी होणार्या त्रासाने ,
वेळोवेळी मीच रडत होतो,
तुझ्याकडून झालेली चुक तुला कधीच दिसली नाही,
माझ्या डोळ्यातून येणार्या अश्रुनाही किम्मत राहिली नाही,
कामाचा दबाव आहे असे म्हणून,
तू माला टाळत होतीस,
पण या कारणा खाली,
तूच माझ्या पासून दुरावत होतीस,
काम तेव्हा मीही करत होतो,
माझ्या कामाचा दबाव तुला दाखवत नव्हतो,
वाटत होते तुला माझ्या साथाची गरज आहे,
तुलाच मी समजुन घेणे हेच माझ्या नशिबात आहे,
तुझे काम हे कधी संपले नाही,
आपल्यातील वाढत गेलेले अंतर,
हे तर कधीच मिटले नाही,
दरोज झोपताना देवाकडे एकच गार्हने असते,
तू सदैव खुश रहावी हेच माझे मागणी असते,
आशा आहे तू पुन्हा माझ्याकडे परतावी,
पण तू येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही,
प्रेम माझे संपणार नाही मी मेल्यावर,
पण आठवण माझीही येइल मी गेल्यावर...आठवण माझीही येइल मी गेल्यावर
......................Unknown Author