आले वाट्याला पुष्कळ दुख तरीही ते सोसून हसावे लागते
चालताना वाटेवर सोबत कुणी नसले तरी चालावे लागते
चालताना रुतले काटे पायात म्हणून मार्ग बदलायचा नाही
आले जरी अपयश पदरात तरी धीर असा सोडायचा नाही
वेदना सहन करतच रक्ताळल्या पायाने मार्गक्रमण करायचे
अपुल्या वाटेतील कोणत्याच संकटाने कधीच नाही हरायचे
यशापयशाची गोळाबेरीज करून परत एकदा तसेच चालायचे
विसावा घेत वळणावळणावर परत फिरून मागे पाहायचे
दुख नसावे मनात सुटल्या क्षणाचे पैलतीर गाटताना
चलता चलता असाच एक दिवस अनंतात विरायचे
..................गजानन माने
No comments:
Post a Comment